"कळतं पण वळत नाही” हि जुनी म्हण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप सत्याची
भूमिका बजावते. जसे आपण एखाद्या धार्मिक स्थळात किंवा देवात सत्व आहे असं म्हणतो
व मानतो. तसच काहीसं ह्या जुन्या म्हणीमध्ये सत्व आहे.
प्रत्येक व्यक्तीला त्याचे दुर्गुण माहित असतात व त्या दुर्गुणांचा होणारा
परिणाम सुद्धा माहित असतो. मग ते दुर्गुण लहान असो वा मोठे व त्यांचा परीणाम
शारीरिक असो वा मानसीक त्यातून एकंदरीत हानीच असते हे सुद्धा आपल्याला माहित असतं.
आपल्याला कळतं कि, कुठली गोष्ट चांगली आहे व कुठली वाईट शिवाय कुठल्या गोष्टीला
लगेच प्रारंभ करायला हवा, प्रथम प्राधान्य द्यायला हवे व कुठल्या गोष्टीला विलंब
करायला हवा.
मग का म्हणून आपण योग्य दिशेला पाउल टाकण्यासाठी विलंब करत असतो..?. चांगल्या
व ज्या गोष्टीतून आपला सर्वांगीण फायदा होणार आहे अश्या गोष्टीची सुरुवात करायला का विलंब करत असतो..?. आपसूकच आपण कुठेतरी मागे खेचले जात असतो...असं का..?. आपल्याला
संपूर्ण ज्ञान असतांना सुद्धा आपण अज्ञानीपणा करतो..असं का..?. आपण दुसऱ्यासाठी
ज्ञानाचे धडे गिरवतो पण बऱ्याचवेळा आपण स्वतः मात्र त्या ज्ञानापासून दूर राहतो
किंवा ते ज्ञान आत्मसात नाही करू शकत...असं का..?
तर स्वतःचे आत्मपरीक्षण करून थोडे निष्कर्ष काढले ते म्हणजे, कदाचित आपण आपल्या
सवयींचे गुलाम झालेलो असतो. आपल्या सवयी आपल्याला जसे झुकवतील तसे आपण झुकत असतो. कुठेतरी
आपला संयम ढासळतो व आपले प्रयत्न कमी पडत असतात म्हणून असं होत असावं. तसेच सर्वात
महत्वाचं म्हणजे आपला आळस व दूरदृष्टीची कमतरता ह्या दोन घातक गोष्टी आपल्याला योग्य गोष्टींना आजच्या
दिवशी प्रारंभ करण्यास विलंब करत असाव्यात. म्हणून आपण चांगल्या गोष्टींना प्रारंभ हा
आज न करता उद्यावर ढकलत असतो.
ह्या विचारतून एक बोध नक्की मिळाला तो म्हणजे “अनमोल वेळ, सुवर्ण संधी व योग्य
वय ह्या तिन्ही गोष्टी आपल्या हातातून नकळत निसटत आहेत.”
तर योग्य गोष्टींचा प्रारंभ हा आजच व या क्षणापासूनच करणार.
(स्वनुभव मांडण्यात मजा थोडी वेगळीच असते कारण स्वनुभव मांडतांना आपण स्वतःला
वाचत असतो.)
..ණ मनोज गुजर