आज खूप लाजिरवाणी परिस्थिती आमच्या नजरेसमोर उभी
ठाकली आहे. ज्या राजाने आमच्यासाठी रक्ताच पाणी केलं. आयुष्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. तलवारीच्या वारांचा शृंगार परिधान केला. ज्याने तलवारीच्या पात्यावर मरण पेलले. जो राजा २४ तासापैकी १७ तास घोड्यावर जीव मिरवत फिरला. मान अपमानाची कधी पर्वा केली नाही. उभं आयुष्य आमच्यासाठी खर्ची घातले आणि शेवटी
ह्याच मातीत शेवटचा श्वास घेतला त्याच शिवरायांचा आम्हाला विसर पडावा. इतकेच नाही
तर आमचा सुशिक्षित वर्ग शिवरायांना काही विशिष्ट राजकारणी पक्षा पुरताच मर्यादित ठेवतोय, एखाद्या जाती पुरताच मर्यादित ठेवतोय इतका कोप झालाय आमच्या संस्कृतीचा, विचार क्षमतेचा व बुद्धिमत्तेचा.
मराठा म्हणजे काय...?
इतिहासाला विसरलेला आमचा सुशिक्षित वर्ग, तरुण वर्ग हा "मराठा" ह्या शब्दाला विशिष्ट जातीपुरताच मार्यादीत ठेवत आहे. प्रथमतः मराठा हि कुठलीही जात नसून एक "पदवी" आहे हे पहिले लक्षात असू द्या. पण आमच्या सुशिक्षित, तरुण वर्गाची विचार क्षमता इतकी खालावली आहे कि ते "मराठा" हि जात समजून
शिवराय हे फक्त मराठा जातीचेच आहेत असा ग्रह निर्माण करून ह्या थोर योध्याच्या पराक्रमाला पाठ फिरवत आहेत व त्या थोर योध्याचे आमच्यावर असलेल्या अथांग उपकराला विसरत आहेत. मराठा ह्या पदवीला आपल्या जाती इतकेच पवित्र
समजनाऱ्यांनी मराठा ह्या पदवीला जातीचा अलंकार चढवून स्वतःला मराठा जातीचे म्हणवून
घेतले हि वस्तुस्थिती आहे मराठा ह्या शब्दा मागची.
शिवराय कोण होते...?
शिवराय हे हिंदू होते. हिंदू असून सर्व धर्मचा आदर करणारे धर्म सहिष्णू
होते. सुपीक विचारांचे कौशल्यपूर्ण शूर योद्धा होते. तसेच शिवरायांचे कार्य हे
फक्त महाराष्ट्रा पुरताच मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी त्यांनी झुंज दिली होती. भारतात राजे बरेच होऊन गेलेत शिवाय त्यांची
कामगिरी सुद्धा खूप धाडसी, हृदयाच्या ठोक्यांना धड धड्विणारी होती. पण शिवराय
प्रत्येक क्षेत्रात निपुण आणि तरबेज असणारा एकमेव राजा होता. हा राजा महाराष्ट्रात जन्माला आणि आमच्या सुशिक्षित, तरुण वर्गाने शिवरायांना
महाराष्ट्रा पुरता, विशिष्ट जाती पुरता मर्यादित ठेवून
त्यांच्या विचारांना, पराक्रमाला आणि इतिहासाला सामान्य
माणसापरियंत पोहचू दिले नाही हि वस्तुस्थिती आहे.
स्वराज्य म्हणजे काय...?
स्वराज्य ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वतःचे
राज्य. शिवरायांनी मोघल काळात इथल्या रयतेवर, शेतकरी, गोर गरीब कुटुंबावर होणारे अत्याचार डोळ्यांनी पहिले होते आणि एकमेव
निश्चय करून संपूर्ण आयुष्य हे रयतेला स्वतंत्र मिळावं, ताठ
मानेने जगण्याचा वसा मिळावा, रयतेच स्वतःच राज्य असावं
म्हणून स्वराज्य निर्मितीसाठी वाहिले, रयतेच्या कल्याणासाठी
वाहिले. म्हणून स्वराज्याचा प्रारंभ हा ई.स १६४८ साली
फत्तेखानाच्या बाळाजी हैबतरावाचा शिरवळ येथे पराभव करून
केला. असा परमार्थाचा विचार बाळगणारा हा राजा होता कि, जाने कधीहि स्वार्थाची अपेक्षा मनी बाळगली नव्हती.
शिव राज्यभिषेक म्हणजे काय...?.
शिव राज्यभिषेक म्हणजे त्या दिवशी शिवरायांनी
स्वराज्याच्या मदतीस, राज्यकारभाराच्या मदतीस अष्टप्रधान मंडळाची स्थापना
केली होती आणि त्या मंडळाचे प्रमुख शिवराय होते. पण शिवरायांनी प्रमुख होण्याचा
मान स्वतःहून न स्वीकारता १८ पगड जातीच्या सहमताने स्वीकारला होता. शिवराय म्हणायचे कि “श्रींच्या कृपेने राज्य मिळाले, हे
राज्य श्रींचे आहे“ म्हणजेच हे राज्य जनतेचे आहे असा उल्लेख
राजांनी केला. म्हणून शिवरायांनी आपल्या राज्याचे नावही हिंदवी स्वराज्य असे
ठेवले. हिंदवी याचा अर्थ हिंदूंचे असा नसून त्याकाळी
हिंदवी या शब्दाचा अर्थ भारतीय असा करण्यात येई. म्हणून ६ जून ई.स १६७४ ला शिव राज्यभिषेक सोहळा थाटात पार पडला. पण तेव्हा राजे ३२ मनी
सिंहासन पाहून थोडे स्तब्द झाले आणि म्हणाले हे सिंहासन खूप मोठे पाहिजे कि
जेणेकरून माझ्या १८ पगड मावळ जातीमधल्या प्रत्येक मावळ्याला त्यावर बसता येईल. ह्या सिंहासनाचा मी एकटा
मानकरी नाहीच हि भावना त्या थोर योध्याची होती.
सदर माहिती हि आमच्या सुशिक्षित, तरुण वर्गाला विसर पडलेल्या इतिहासाची, शिवरायांची, शिवरायांच्या कर्तुत्वाची, पराक्रमाची जाणीव करून
देण्याकरिता सादर केली आहे.
(एकच विनंती कि शिवरायांना कुठल्याही जाती
पुरता, पक्षा पुरता, राष्ट्रा पुरता मर्यादित ठेऊ नका तर शिवरायांना व शिवरायांच्या इतिहासाला सामान्य माणसापरियंत पोहचवा.)
शिवरायांची प्रशासनव्यवस्था
व अष्टप्रधानमंडळ खालील चित्रात दाखवले आहे.
..ණ मनोज
गुजर
