Sunday, 8 September 2013

कटू सत्य.

एक कोणतीतरी गुपित शक्ती माणसाच्या शरीरात आहे कि ज्या शक्तीमुळे माणसाचे तोंड बोलते, माणूस डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, नाकाने श्वास घेऊ शकतो, माणसाचे हात हलतात, पाय चालतात, मेंदू काम करतो आणि लगेच प्रतिसाद सुद्धा देतो, माणसाचे हृदय धडधडते, त्या शक्तीच्या असण्यामुळे माणूस नाचतो, गीत गातो प्रत्येक गोष्ट करू शकतो.
   
हे सर्व त्या शक्तीच्या असण्यामुळे होत असतं. 

पण ती शक्ती माणसाच्या शरीरातून निघून गेली तर माणूस बोलू शकत नाही, डोळ्याने पाहू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाही, त्याचे हात हलवू शकत नाही, त्याचे पाय चालू शकत नाही, मेंदू कार्य करत नाही आणि हृदय सुद्धा धडधडणे बंद होते, आयुष्यातल्या सर्व गोष्टी एकदम थांबतात आणि माणूस कायमचा झोपतो. 

हे सर्व त्या शक्तीच्या नसल्यामुळे होत असतं.  

मग ती शक्ती नेमकी काय आहे...???

तर त्या शक्तीला काही लोकं चेतना शक्ती म्हणतात, आत्मा म्हणतात, परमात्मा म्हणतात, काही देव म्हणतात. प्रत्येकाचं समजणं आणि मानणं वेगवेगळं आहे त्यात दुमत नाही.  

जय जिजाऊ
जय शिवराय 

शिव-अर्पण मनोज  दि ०८/०९/२०१३