Thursday, 5 September 2013

केवळ बोलण्यामुळेच.


माणसाच्या जीवनात आजवर कोणतीही गोष्ट झाली असेल, होत असेल किंवा भविष्यात होईल तर ती फक्त बोलण्यामुळेच.

रामायण झाले ते बोलण्यामुळे.
महाभारत घडले ते बोलण्यामुळे.

वाद होतात ते बोलण्यामुळे.
वाद सुटतात ते बोलण्यामुळे.

मैत्री होते ते बोलण्यामुळे.
मैत्री तुटते ते बोलण्यामुळे.

आपले परके होतात ते बोलण्यामुळे.
परके आपले होतात ते बोलण्यामुळे.

प्रेम होते ते बोलण्यामुळे.
प्रेम तुटते ते बोलण्यामुळे. 

मन जुळतं ते बोलण्यामुळे.
मन दुरावते ते बोलण्यामुळे.

नाते जुळतात ते बोलण्यामुळे.
नाते तुटतात ते बोलण्यामुळे.

ज्ञानी ठरतो ते बोलण्यामुळे.
अज्ञानी ठरतो ते बोलण्यामुळे.

यशस्वी होतो ते बोलण्यामुळे.
अयशस्वी होतो ते ते बोलण्यामुळे.

जीवनात उच्च पदी बसतो ते बोलण्यामुळे.
जीवनात नेहमी खाली बसतो ते बोलण्यामुळे.


सांगण्याचा उद्देश एकच आहे कि, जीवनात ईतरांशी संभाषण, संवाद साधतांना नेहमी नम्रतेने साधा, मुखात नेहमी गोडवा असू द्या. ज्या विषयाची आपल्याला माहिती नसेल तर त्या विषयाची माहिती समोरच्याकडून माहित करून घ्या आणि जर तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती असेल तर त्या विषयाची माहिती समोरच्याला माहित करून द्या.

प्रत्येकाचे विचार सारखेच असतील असे नाही पण आपल्या बोलण्यात जर नम्रता असेल तर समोरच्याला आपले विचार आपण पटवून देऊ शकतो.

विद्या विनयेन शोभते हे समीकरण ध्यानात असू द्या.
 
जय जिजाऊ
जय शिवराय 
 
शिव-अर्पण मनोज  दि ०५/०९/२०१३

एक सुंदर काव्य "पेक्षा"....


परिस्थितीवर रडण्यापेक्षा 
परिस्थितीशी लढण्यात मजा आहे.
नशिबावर नतमस्तक होण्यापेक्षा 
मेहनत करण्यात मजा आहे.

स्वार्थ मिरविण्यापेक्षा 
परमार्थ करण्यात मजा आहे.
फक्त फुल झेलण्यापेक्षा 
काट्यावर चालण्यात मजा आहे.

व्यसनात झिंगण्यापेक्षा 
बलाढ्य बनण्यात मजा आहे.
अस्तित्व शून्य जगण्यापेक्षा 
नाव करून मारण्यात मजा आहे.

फक्त घेण्यापेक्षा 
मनापासून देण्यात मजा आहे.
सुखात राहण्यापेक्षा 

दुखं झेलण्यात मजा आहे.

अश्रू ढाळन्यापेक्षा 
कुणाचे अश्रू पुसण्यात मजा आहे.
कुणाची चाकरी करण्यापेक्षा 
कष्टाची भाकरी खाण्यात मजा आहे.


जय जिजाऊ
जय शिवराय 
  
शिव-अर्पण मनोज  दि ०५/०९/२०१३