माणसाच्या जीवनात आजवर कोणतीही गोष्ट झाली असेल, होत असेल किंवा भविष्यात होईल तर ती फक्त बोलण्यामुळेच.
रामायण झाले ते बोलण्यामुळे.
महाभारत घडले ते बोलण्यामुळे.
वाद होतात ते बोलण्यामुळे.
वाद सुटतात ते बोलण्यामुळे.
मैत्री होते ते बोलण्यामुळे.
मैत्री तुटते ते बोलण्यामुळे.
आपले परके होतात ते बोलण्यामुळे.
परके आपले होतात ते बोलण्यामुळे.
प्रेम होते ते बोलण्यामुळे.
प्रेम तुटते ते बोलण्यामुळे.
मन जुळतं ते बोलण्यामुळे.
मन दुरावते ते बोलण्यामुळे.
नाते जुळतात ते बोलण्यामुळे.
नाते तुटतात ते बोलण्यामुळे.
ज्ञानी ठरतो ते बोलण्यामुळे.
अज्ञानी ठरतो ते बोलण्यामुळे.
यशस्वी होतो ते बोलण्यामुळे.
अयशस्वी होतो ते ते बोलण्यामुळे.
जीवनात उच्च पदी बसतो ते बोलण्यामुळे.
जीवनात नेहमी खाली बसतो ते बोलण्यामुळे.
सांगण्याचा उद्देश एकच आहे कि, जीवनात ईतरांशी संभाषण, संवाद साधतांना नेहमी नम्रतेने
साधा, मुखात नेहमी गोडवा असू द्या. ज्या विषयाची आपल्याला
माहिती नसेल तर त्या विषयाची माहिती समोरच्याकडून माहित करून घ्या आणि जर तुम्हाला
एखाद्या विषयाची माहिती असेल तर त्या विषयाची माहिती समोरच्याला माहित करून द्या.
प्रत्येकाचे विचार सारखेच असतील असे नाही पण
आपल्या बोलण्यात जर नम्रता असेल तर समोरच्याला आपले विचार आपण पटवून देऊ शकतो.
विद्या विनयेन शोभते हे समीकरण ध्यानात असू द्या.
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव-अर्पण मनोज दि – ०५/०९/२०१३