एखादा माणूस, दिन रात कष्ट करतो, मेहनत करतो, अनेक संकटाना तोंड देतो, परीस्थितीशी लढा देतो, झोप विसरतो, सुखं त्यागतो, अनेक दुखं झेलतो आणि जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा लोक म्हणतात, खरचं “नशिबवान” आहे तो. पण त्याच्या यशाच्या मागे हि सारी मेहनत त्याने घेतलेली
असते हे मात्र आम्ही विसरतो आणि फक्त म्हणत असतो नशीबवान आहे
तो.
हि आहे नशीबाची खरी व्याख्या.
पण आम्ही मेहनतीला बगल देऊन यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतो आणि
त्यात अपयश पदरी आले कि, आमच्यात नशीब ह्या शब्दाचा जन्म होतो आणि आम्ही म्हणतो कि माझ्या नशिबातच नव्हते ते. अपयश आल्यावर आपणच आपल्या मनाची केलेली समजूत
म्हणजे नशीब.
हि आहे आम्ही केलेली नशीबाची व्याख्या.
..ණ मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३
nice....aristotal...che niti shastra avrjun vacha.
ReplyDelete