Saturday, 23 November 2013

"विचार" एक महान शक्ती आहे.

"विचार" हि जगातली सर्वात मोठी ताकद आहे. 
 
उदाहरण देतो.... 
 
आम्ही जेव्हा अयशस्वी होतो किंवा आमच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ लागतात तेव्हा आम्ही पंडिताकडे जाऊन आमचे भाग्य पाहतो आणि त्यावर तो पंडित आम्हाला आमच्या अडचणी दूर होण्यासाठी हाताच्या बोटात राशीच्या खड्याची अंगठी घालण्याचा सल्ला देतो आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही बोटात अंगठी घालतो व त्याच क्षणी आमच्या डोक्यात (Thought Create) विचार निर्माण होतो कि, यापुढे माझं सर्व काही ठीक होईल. मग तो विचार आमच्या कृतीतून आणि सकारात्मक दृष्टीकोनातून प्रत्येक कार्यात उतरतो आणि आम्ही यशस्वी होऊ लागतो. पण कालांतराने आम्हाला विसर पडतो कि, आम्ही राशीच्या खड्याची अंगठी बोटात घातली आहे व आमच्या डोक्यात निर्माण झालेला "माझं सर्व काही ठीक होईल" हा विचार पुसला जातो आणि मग पुन्हा पूर्वीसारख्या अडचणी निर्माण होऊ लागतात. तेव्हा आम्ही ज्या पंडीताकडून राशीच्या खड्याची अंगठी घेतली होती त्या पंडिताकडे जातो आणि पूर्वरत परीस्थिती निर्माण झाल्याचे सांगतो तेव्हा तो पंडित आपण घातलेली अंगठी आपल्याला काढायला सांगतो व तिला तेलात, मिठात घोळून पुन्हा आपल्या बोटात घालायला सांगतो. मग आम्ही पंडिताने सांगितल्याप्रमाणे अंगठीला तेलात, मिठात घोळतो व ती अंगठी पुन्हा बोटात घालतो आणि आमच्या डोक्यात यापुढे "माझं सर्व काही ठीक होईल" हा विचार पुन्हा निर्माण होतो (Thought Remind) आणि आमचं सर्व काही ठीक होऊ लागतं व सुरळीत चालतं.

हे सर्व काही मांडण्यात एकच निष्कर्ष समोर येतो कि, आमच्या जीवनात सुरळीत आणि सर्व काही ठीक हे आमच्या विचाराने होत असतं, राशीच्या खड्याच्या अंगठीने किंवा पंडिताच्या सल्ल्याने नाही.

"
माझं सर्व काही ठीक होईल" हा एवढासा विचार जर आम्ही आमच्या डोक्यात पिकवला तर पैसा खर्च न करता आम्ही आमचं जीवन सुरळीत व अडचणींवर मात करत जगू शकतो त्यासाठी कुण्या पंडिताकडे जाण्याची गरज नाही.
 
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव-अर्पण मनोज  दि /११/२०१३

No comments:

Post a Comment