Sunday, 7 September 2014

भविष्य

आपलं भविष्य दुसरा तिसरा कोणीही घडवत नसतो तर आपला प्रत्येक विचार आपले भविष्य घडवत असतो.

जसे कर्म कराल तसं फळ मिळेल. मग कर्म चुकीचे, नकारात्मक (Negative) असेल तर कोणत्या न कोणत्या वेळी फळ सुद्धा (Negative) नकारात्मकच मिळेल, त्याचं रिटर्न माणसाला अवश्य मिळतं हे निश्चित. कर्म चांगले (Positive) असेल तर फळ सुद्धा चांगलेच (Positive) मिळेल यात दुमत नाही.

आपलं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर त्यासाठी आपण कोणत्या कर्माची निवड करावी हे आपणच ठरवायचं असतं. त्यासाठी कुठल्या ज्योतीष्याकडे जाऊन हात दाखवाची गरज नाही, कुठला खडा बोटात घालायची गरज नाही, वास्तुशास्त्राप्रमाणे जागा बदलण्याची गरज नाही. असल्या बाह्य  बदलाने आपले भविष्य घडणार नाही तर आपल्या आंतरिक बदलाने आपले भविष्य घडणार आहे.

.. मनोज गुजर 

No comments:

Post a Comment