Monday, 2 September 2013

विचार ३१.

तरून पिढीची मस्तके सुधारली तर अर्थव्यवस्था सुधारायला वेळ नाही लागणार आणि तरून पिढीची मस्तके तेव्हाच सुधारतील जेव्हा त्यात महापुरुषांचे विचार, सुपीक विचार आणि वस्तुस्थिती यांची जाणीव व भरणा केला जाईल. कारण मस्तके सुधारली कि, सकारात्मक विचार दृष्टीकोन यांचा जन्म होतो आणि सकारात्मक विचार दृष्टीकोन ह्यामुळे मनुष्य बुद्धीचा सुलभ सुपीक वापर करतो आणि बुद्धीच्या सुलभ सुपीक वापरावर मनुष्य आर्थिक सत्ता गाजवतो हि वस्तुस्थिती आहे.

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०१/०८/२०१३

विचार ३०.

माणसाने कार्य असे करावे कि आपण काही न बोलता आपले कर्तुत्व सर्व काही बोलायला हवे.
पण आज परिस्थिती वेगळी आहे, आज बाजारगप्पा करणारे फडफड तोंड वाजवताय आणि कर्तुत्वशून्य जगताय.
 
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०१/०८/२०१३

विचार २९.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदर द्या व त्या व्यक्तीचा आदर करा. कदाचित भविष्यात ती व्यक्ती तुमचा आधार होऊ शकते. 
पण एक लक्षात असू द्या कि, भविष्यात आपल्याला आधार हवा आहे म्हणून आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदर देऊ नका तर निस्वार्थी भावना मनी ठेऊन आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदर द्या व त्या व्यक्तीचा आदर करा.

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ३१/०८/२०१३

विचार २८.

आपण स्वतःला सिद्ध केलं तर प्रसिद्धी हि आपसूक मिळते हि वस्तुस्थिती आहे.

जय जिजाऊ
जय शिवराय
 
शिव-अर्पण मनोज दि - ३०/०८/२०१३